ताज्या घडामोडी

शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी खु येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

शालेय शिक्षणातील जिद्द व मेहनत हिच यशस्वी जिवनाची गुरूकिल्ली.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

ध्येय गाठुन विद्यार्थ्यांचे भावी जिवन यशस्वी होण्यासाठी शालेय शिक्षणात जिद्द व मेहनत हीच गुरूकिल्ली आहे.हे विचार विद्यार्थ्यांनी सदैव कृतीत आणावेत असे मत वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव नखाते यांनी केले.
पाथरी तालुक्यातील शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी खु.येथे शुक्रवारी २४ जुन रोजी दहावी परिक्षतेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव नखाते हे बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कृऊबासचे माजी संचालक नारायणराव आढाव, सरपंच नारायणराव भदर्गे,उपसरपंच आबेदखाँ पठाण,दिलावरखाँ पठाण, महेश वाडेकर, गजानन जाधव,मुख्याध्यापक शामसुंदर शेळके यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलतांना नखाते म्हणाले की,शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मेहनीतीमुळे शाळेचा निकाल शंभर टक्के लागला यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे.तसेच ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षण प्रवाहात रहावे यासाठी ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला पाहिजे.गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आमची शैक्षणिक संस्था कटिबद्ध आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी दहावी परिक्षेत शाळेतून गुणानुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांने उत्तीर्ण होणाऱ्या दिव्या दीपक जाधव,ऋतुजा रमेशराव घाटूळ,नेहा युवराज आतकरे या विद्यार्थ्यांसह शाळेतील ७५ टक्के गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचालन ए.टी.सोनवणे यांनी केले तर ओ.एम.लांडे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close