रेशनचा धान्यासाठी दहा कीलोमीटरची पायपिठ मोकळी
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2022/06/IMG-20220621-WA0213.jpg)
आकाश श्रीरामे यांनी निवेदनातुन केले गावकऱ्यांच स्वप्न पुर्ण.
खंडाळा गावकऱ्यांन मध्ये आनंदाचं वातावरण.
आता कंट्रोल शासकीय धान्य वाटप खंडाळा गावातच.
मुख्य संपादक: कु.समिधा भैसारे
पेठभानसुली गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या खंडाळा गावातील नागरिकांना जीवाची बाजी लावत जंगल परिसरातुन दहा कीलोमीटरचे अंतर पार करून महीण्याचे रेशनचे धान्य आणावे लागत होते याचा त्रास नागरिकांना होत होता.
त्यामुळे कंट्रोल चे शासकीय धान्य वाटप खंडाळा गावातच वाटप करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आकाश श्रीरामे यांनी गावकऱ्यांनचा वतीने नायब तहसीलदार तुळशीदास कोवे यांना निवेदनातुन करण्यात आली . त्यानंतर नायब तहसीलदार तुळशीदास कोवे यांनी निवेदनाची दखल घेवुन लवकरच एका आठवड्यातच मागणी पूर्ण केली व आता शासकीय धान्य वाटप खंडाळा गावातच होत आहे .
चिमुर तालुक्यातील शेवटचा टोकावर असलेल्या खंडाळा गावाचा समावेश पेठभानसुली गटग्रामपंचायत मधे असुन खंडाळा गावाची लोकसंख्या अंदाजे चारशेचा घरात आहे सरकारी रेशनचे धान्य दुकान हे गावापासून दहा कीलोमीटर अंतरावर होते पावसाळयाचा दीवसात धान्य गावकऱ्यांना लांबुन आणतांना मोठी कसरत करावी लागत होती त्यामुळे नागरिकांना व वृद्ध व्यक्तीना अनेक दीवसापासुन मोठा त्रास सहन करावा लागत होता आता खंडाळा गावातच कंट्रोलचे शासकीय धान्य वाटप होत असुन सामाजिक कार्यकर्ते आकाश श्रीरामे यांनी नायब तहसीलदार तुळशीदास कोवे यांना दीलेल्या निवेदनातुन गावकऱ्याच स्वपन पुर्ण केले यामुळे खंडाळा येथील गावकऱ्यांनमधे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.