खांबाळा ते हरणी रस्त्याचे डांबरीकरण करा – भारतीय क्रांतिकारी संघटनेची मागणी
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
चिमुर तालुक्यातील खांबाळा ते हरणीकडे जाणारा रस्ता अतिशय कच्चा असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता पावसाळा ऋतूला सुरूवात होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात जागोजागी पाणी साचून रस्त्याची दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही. अशी अवस्था झाली आहे.
भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा यानीं भेट दिली असता गावातील नागरिकांनी रस्त्यांची समस्या मांडताना, याकडे गेल्या 15-20 वर्षापासून स्थानिक जनप्रतिनिधीना रस्ता बाधंकाम करण्यासाठी वारंवार मागणी केली. कसल्याही प्रकारची दखल न घेता निवळ टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही याकडे लक्ष दिलेले नाही. निवडणुकीच्या काळात नागरिकांना फक्त आश्वासन देऊन समाधान केले जाते. असे यावेळी म्हणाले.
जनप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे समस्त नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय क्रांतिकारी संघटनेनी गावातील नागरिकांच्या रस्त्याच्या समस्याची दखल घेतली आणि खांबाळा ते हरणी रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने नक्कीच प्रयत्न करू असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यानीं म्हटले. प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण सुरु करण्यात यावे अशी जाहिर मागणी केली.