ताज्या घडामोडी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालमेळाव्यात श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाच्या दोन बालकवयित्रींची निवड

दोन बालकवयित्री करणार कवितांचे सादरीकरण.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

उदगीर : उदगीर येथे संपन्न होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालकुमार साहित्य मेळावा या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या कविता व कथा मागवण्यात आल्या होत्या.संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या साहित्यातून माजलगाव येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाच्या दोन बालकवयित्रींच्या कवितांची निवड झाली आहे.यामध्ये कु श्रेया सोळंके व कु.राधिका जोशी या बालकवयित्रींना संमेलनाच्या संयोजन समितीकडून काव्यवाचनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
निवड झालेल्या या दोन बालकवयित्रींचे ‘ शिक्षणविवेक ‘ या अंकातून साहित्य प्रकाशित झालेले आहे. तसेच शाळेतील अनेक उपक्रमात त्या सातत्याने सहभागी होत असतात .
दोघींच्या या निवडीबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.सुरेंद्र आलुरकर, उपाध्यक्ष मा. श्री. राधेश्याम लोहिया, कार्यवाह मा.श्री नितीन शेटे,सहकार्यवाह मा.प्रा.श्री चंद्रकांत मुळे, मा.डॉ.हेमंतजी वैद्य,मा.डॉ.कल्पनाताई चौसाळकर,श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक सुनील लोढा,अध्यक्ष प्रकाश दुगड,कार्यवाह अमरनाथ खुर्पे, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष प्रेमकिशोर मानधने, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी,उपमुख्याध्यापक विजेंद्र चौधरी सर,पर्यवेक्षक उमेश थाटकर,रवींद्र खोडवे, मिलिंद वेडे,कमलाकर झोडगे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close