ताज्या घडामोडी

शासकीय योजनेतून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधा

पंचायत समिती वरोरा येथील आमसभेत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना.

ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुराणकर खेमजई वरोरा

केंद्र व राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी, नागरिकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविते. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून समाजातील आर्थिक दारिद्र्य दूर करता येते. तरी कार्यान्वयीन यंत्रणांनी योजनांच्या अंमलबजावणीतून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधावा, अशा सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या. त्या वरोरा पंचायत समिती येथील आमसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी २० विभागाचा आढावा घेतला.

यावेळी गटविकास अधिकारी राठोड, सभापती धोपटे, उपसभापती भोयर, बाजार समिती सभापती राजू चिकटे, माजी सरपंच मिलींद भोयर, श्री पावडे यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सचिव उपस्थिती होते.

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर आढावा घेताना अधिकाऱ्यांना अनेक विषयावर सूचना केल्या. त्यामध्ये सद्य शेतात पीक उभे आहे. त्याकरिता पाणी देण्याकरिता दिवस वीज पुरवठा देणे गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा करून दिवसा वीजपुरवठा देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यासोबतच ग्रामीण भागातील जनतेला हक्काचे घर मिळावे. त्याकरिता कागद पात्रांची कमी असल्याने अधिकारी त्यांना योजनांपासून वंचित घेवंत असल्याच्या तक्रारी असतात. त्याकरिता त्यांनी अधिकाऱ्यांना सर्व लाभार्थ्यांना हक्काचे व लवकर घरकुल योजनांचा लाभ देण्याचे त्यांनी सांगितले. यासह अन्य विषयावर देखील यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चर्चा करीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यासह ग्रामीण भागाचा विकासासाठी कोणतीही योजना असो त्यापासून ग्रामीण भागातील जनता वंचित राहता कामा नये यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याचे त्यांनी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close