ताज्या घडामोडी

माजलगांव धरणाला माणिक शहा धरण असे नांव दया -शेख रशिद

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

बीड,माजलगांव शहर व शेतकरीसाठी तालूकादृष्टी पाणी अतिमहत्वाच्या माजलगांव धरणाला माणिक शहा धरण असा नांव दया अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष शेख रशिद यांनी केली आहे.
माजलगांव येथे पिंर वलि माणिक शहा दर्गा अशी प्रसिध्द दर्गा होती. सर्व समाजातून भाविक दर्शन करण्यासाठी येत होते तसेच आज ही भाविक मनःपूर्वक प्रार्थना करतात.माजलगांव येथे माणिक शहा दर्गा व परिसरात महाराष्ट्र सरकारने धरण बांधण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतर तेव्हाचे मूख्यंञी शंकरराव चव्हाण व उपमुख्यमंत्री सूदंरराव सोळंके अतिप्रयत्न करत होते पन माणिक शहा दर्गा व परिसरात धरण न बांधावे हयासाठी सर्व समाजातून आंदोलन करण्यात आले होते.महाराष्ट्र सरकार व आंदोलनकर्ते मिळून शेवटी निर्णय झाला की दर्गासाठी वेगळी जागा देण्यात आली पन आतापर्यंत दर्गा कमिटीला पिंरवलि माणिक शहा ची कंबर व साहीत्य कूठं ठेवलेली माहीत नाही तसेच सरकारने दिलेली जागेवर अतिक्रमण झालेलं आहे. हा सर्व इतिहास पाहता माजलगांव येथे प्रसिद्ध अशी माणिक शहा दर्गा सर्वांना पाणी मार्फत आशिर्वाद देत आहे त्यामुळे पिंर वलि माणिक शहा दर्गा व परिसराला माणिक शहा धरण असा नांव दया अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिध्द पञकात केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close