ताज्या घडामोडी

संघर्षावर मात करणां-या उपराजधानी नागपूरच्या मायाताई काेसरे

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

शब्द पाळता येत नसेल तर
काेणाला शब्द द्यायचा नाही या तत्वाशी एकरुप असणां-या मायाताई काेसरे यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यात झाला .मायाताईंचे पिताश्री हे एक जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक हाेते .जिल्ह्याचे ते असल्यामुळे व डाँक्टरी व्यवसायात प्रविण्यपूर्ण असल्या कारणाने नागरिकांशी त्यांची नाळ चांगलीच जुळली हाेती .एका स्वातंत्र्य सैनिकाची मायाताई ही कन्या असल्यामुळे हळहळु त्यांचाही परिचय समाजात झाला .परंतु मायाताईंचे लग्न झाल्या नंतर अधिक काळ त्या सुखी जिवनाचा आनंद उपभाेगू शकल्या नाही हे दुख:सहजच त्यांचे मनाशी सलते आहे याच परिस्थितीवर मात करतांना त्यांना साेनू व माेनूचा सांभाळ करावा लागला .त्यातच जानाळा येथील शेतीची जबाबदारी त्यांचे खांद्यावर आली .कठीण संघर्षाचा सामना करीत मायाताईने आपल्या दाेन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले .त्या पैकी साेनु (मायाताईची माेठी कन्या) तरं माेनु (छाेटी कन्या पुनम )! साेनु ही विवाहानंतर आज सुखी संसारात रमली आहे .एव्हढचं नाही तर उपराजधानीत ती जाँब सुध्दा करतेय आहे .छाेटी कन्या माेनु इंजीनियर झाली आहे.सध्या तिची स्पर्धा परीक्षेची तयारी जाेरात सुरु आहे . घर संसार सांभाळुन मायाताई याेगाचे क्लाँस नागपूरात घेते आहे .पतंजलीशी त्यांचे आजपावेताे तेव्हढेच मधुर व गाेड संबंध राहिलेले आहे .टीकाकारांच्या टीके कडे दुर्लक्ष करणे हेच ध्येय मनाशी जपुन त्यांनी आज ख-या अर्थाने यशाची पायरी गाठली आहे .महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाची गत पांच वर्षापुर्वि निर्मिती झाली. तेव्हा मायाताईंच नांव पहिल्यांदा एक महिला कास्तकार म्हणुन सहजं सुचलंशी जुळल्या गेले .नंतर वैदर्भिय साहित्य क्षेत्रातील मेघाताईं धाेटे यांना या व्यासपीठात सामावून घेण्यांत आलं ! आजच्या घडीला संहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका म्हणून आपली जबाबदारी त्या (दाेघींही) तेव्हढ्याच जबाबदारीने नित्य नेमाने पाळते आहे .सहजं सुचलं विस्तार फार भव्य दिव्य स्वरुपात असुन या क्षणाला महाराष्ट्राच्या कानाेकाेप-यातील एक हजार पेक्षा अधिक महिला सहजंच्या सदस्या आहे .हे थाेडे थाेडके नव्हे ! व्यासपीठावरील महिलांच्या कलागुणांना वाव देणे हाच एकमेव उद्देश्य या ग्रुपचा आहे .मायाताईंचं या व्यासपीठा साठी अनमाेल योगदान आहे. हे विसरता येण्यांसारखे नाही .आम्हा सर्वासाठी त्या प्रेरणादायी आहे हे सहजंरित्या व प्रांजळपणे आम्हाला कबूल करावेच लागेल. असे सहजं सुचलं वरील सदस्या म्हणतात. विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील वरुड या ग्रामीण भागातील रितू लाेहकरे (इंजीनियर) सारख्या एका महाविद्यालयीन तरुणीने या व्यासपीठाची मुहुर्तमेढ राेवली हे आजही मायाताईंच्या चांगलेच स्मरणात आहे .व्यासपीठावरील सर्व महिला सदस्यांना घेवून चालणां-या मायाताईंच्या नावांतच !!माया!! साठवली आहे .त्यामुळे सदासर्वदा हे व्यासपीठ असेच सुरु राहील याची आशाच नाही तर पुर्णता खात्री आहे.अश्या कर्तूत्वान मायाताईं काेसरे यांनी नुकताच १२दिवसांचा लद्दाख दाैरा केला .त्यांनी या दाै-यात अनेक प्रेक्षणिय स्थळांना भेटी दिल्या. आज ही नागपूरात त्या याेगा क्लाँस घेतात .महिला वर्गात त्या विशेष लाेकप्रिय आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close