ताज्या घडामोडी

जनता दरबारला उत्स्फूर्त प्रतिसाद

जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे — पालकमंत्री मेघना बोर्डीकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि. 24 /02/2025. जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात “जनता दरबार” पार पडला.
आपल्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी, जिल्हयातून मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. तक्रारदारांची समस्या स्वत: पालकमंत्री यांनी जाणून घेत जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तक्रारींचे तातडीने निरसन करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. एकूण 651 अर्जदारांनी आपल्या तक्रारी सादर केल्या. तक्रारदारांना कुठलीही अडचण भासू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने अतिशय काटेकोरपणे नियोजन केले होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close