चिमूर क्रांती सांस्कृतीक लोककला मंडळ च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मा सांस्कृतिक मंत्रालय मुंबई यांना निवेदन देण्यात आले
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2020/10/IMG-20201009-WA0019-1.jpg)
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
देशात सर्वत्र कोरोना महामारीने कहर केला असून देशाला हादरा दिला अशातच शासन आणि प्रशासनाने वेळीच जागृकता दाखवून वेळोवेळी लाकडाऊन करून जनतेला सतर्क रहा व घरीच रहा असा इशारा दिला व कोरोना या विषाणूजन्य रोगाची जनसामान्य माणसात जनजागृती केली परन्तु ग्रामीण भागातील लोक कलावंताचे कार्यक्रम उदा . नाट्य , खडीगमत ,कलापथक, पथनाट्य, कीर्तन, भजन, भारुड, हरिपाठ, गोधड, डहाका , दडांर असे अनेक समाज प्रबोधनपर कार्यक्रम कोरोनाच्या महामारीत बंद करण्यात आले त्यामुळे अनेक लोककलावंताला व त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला आपल्या उदरनिर्वाहाचे प्रश डोळ्या समोर उभे आहे
तर अनेक महिन्या पासून काही कलावंताचे मानधन सुद्धा थकीत असल्याने तर काही लोक कलावंताच्या फाईली प. स . कार्यालयात पेंडीग पडल्या असून या सर्व कलावंतावर उपासमारीची पाळी आली असून सर्व समस्याचे निवेदन ग्रामीण लोककलावंताच्या मार्फत मा सांस्कृतिक मंत्रालय मुंबई यांना उपविभागीय अधिकारी याना देण्यात आले.
निवेदन देत असताना श्रीकृष्ण नन्नावरे सहसचिव एकनाथ बोरकर कोषाध्यक्ष पंढरी धोंगडे , केशव वरखेडे, शंकर सोनवाणे, दामोदर बोरकर, सुखदेव धारने , पुडलीक राणे, रत्नमाला सोनूले, मनीषा श्रीरामे, इंदिरा नैतांम, शीला जांभुळे व अशा अनेक भजन मंडळांचे सदस्य चिमूर तहसील कार्यालय मध्ये निवेदन देत असताना उपस्थित होते.