जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची राजपूर पॅच येथे सदिच्छा भेट
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
गडचिरोली जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी श्री मास्तोळी यांचे राजपुर पॅच येथील शेतकऱ्यांना सदिच्छा भेट या भेटीदरम्यान मास्तोळी साहेब यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला अमृत महोत्सवी कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यासाठी भरपूर योजना आहेत, त्त्या योजनेचा लाभ घ्यावा, गडचिरोली जिल्हा वनव्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे,वनऔषधीआणि मोठ्या प्रमाणात मोहफुल संकलन केला जातो, शास्र्तोक्त पध्दतीने काळजी घेऊन मोहफुल संकलन केल्यास त्याला योग्य भाव योग्य बाजारपेठ मिळते, तसेच शेतात सिंचान योजना,ट्रॅक्टर खरेदी असे अनेक योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. आपल्या काही अडचणी असल्यास थेट कृषी विभाग याकडे आपली अडचण सांगा ते प्रामुख्याने सोडविण्यास आम्ही प्रयत्न करू, परंतु कुठलाच शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये याबाबत गावातील युवक युवा पिडीनी लक्ष देऊन शेतकर्याच्या समस्या सोडविण्यास मदत करावे असे यावेळी चर्चेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मास्तोळी साहेब बोलत होते, यावेळी राजपुर पॅच ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच सुरेश गंगाधरीवार माजी उपसरपंच पांडुरंग रामटेके,लिंगाची झाडे पेन्टुजी अलोने, प्रवीण निकेसर, लक्ष्मण तावडे, रुषी सोनटक्के, प्रकाश निकेसर, प्रमोद दुर्गे, आदींनी या चर्चासत्रात सहभागी झाले. अचानक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी भेट दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले .