ताज्या घडामोडी

ऑल इंडिया पँथर सेना चक जांभुळविहीरा येथे संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी दि . २६ नोव्हेंबर १ ९ ४ ९ ला देशाला भारताचे संविधान अर्पण केले . या देशातील समस्त भारतीयांना समता , स्वातंत्र , बंधुता व न्याय या तत्वांच्या आधारे त्यांचे हक व अधिकार बहाल केले . या देशातील विषमता वादी समाज व्यवस्था नष्ट करून मानवी समतामुलक समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून व एक मजबूत बलशाली भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने या देशाला संविधान अर्पण केले . तो दिवस भारतवासियांसाठी सुवर्ण दिवस आहे त्याची माहिती समस्त भारतीय नागरिकांना व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे . आपण संविधान साक्षरता चळवळीला तन – मन – धनाने सहकार्य करून कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान ऑल इंडिया पँथर सेना चक जांभुळविहीरा यांचे कडून करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close