ताज्या घडामोडी

गोठ्यावर हल्ला चढवून वाघाने बैलाला केले ठार

हरणी येथील घटना

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

चिमूर तालुक्यातील नेरी जवळील हरणी येथे वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची घटना दि. 21 जाने. ला रात्रौच्या सुमारास घडली.
हरणी येथील गजानन गुलाब रणदिवे यांच्या मालकीच्या गोठ्यात तीन बैल बांधले असताना रात्रो च्या सुमारास शेतात दबा धरून बसलेल्या मोट्या वाघाने गावात शांतता पडू दिले आणि मध्यरात्री गावाकडे शिकारीसाठी आपला मोर्चा वळविला सगळीकडे सामसूम असताना वाघाने गजानन रणदिवे यांच्या गोट्यावर हमला चढविला या गोठ्यात तीन बैल बांधले होते वाघाने एका बैलावर हमला करून त्याला जागेवरच ठार केले ओडून नेण्याचा प्रयत्न केला परंतु नेऊ शकला नाही सकाळी गोट्याचे मालक आले असता त्यांना ही बाब माहिती पडली त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाला दिली
हरणी या गावात व परिसरात वाघाची खूप मोठी दहशत आहे मागील काही महिन्यांपूर्वी ननावरे नामक इसमाला शेतात वाघाने ठार केले होते त्यामुळे या वाघाचे या परिसरात वावर आणि शेतकरी वर्गात मोठी दहशत आहे गावात घुसून बैल मारतो यामुळे गावात दहशत आहे तेव्हा वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून वन कर्मचाऱ्यांना पाहऱ्यावर ठेवावे आणि वाघाला या परिसरातून हाकलून लावावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे
सदर घटनेची माहिती मिळताच नेरी वनपरिक्षेत्र चे क्षेत्रसहायक सी एन रासेकर वनरक्षक श्रीकृष्ण नागरे यांनी घटनास्थळी जाऊन मूत बैलाचा पंचनामा केला सदर बैल हा 50 हजार रुपये किमतीचा असून सदर शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी व वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close