माजलगाव तालुक्यातील बिबट्याला तात्काळ जेरबंद करा :- नुमान चाऊस
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240112-WA0010.jpg)
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
तालुक्यात मागील आठवडाभरापासून बिबट्याने अनेक गावात हैदोस घातला आहे. त्यातच काल (गुरुवारी) सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान फुले पिंपळगाव येथील उंबरे वस्तीवर महिला काम करत असताना बिबट्या झडप मारण्याच्या तयारीतच होता, देव बलवत्तर म्हणून पाळीव कुत्र्याने प्रतिकार केल्याने सुदैवाने त्या महिलेचे प्राण बचावले. माजलगाव तालुक्यातील मंगरूळ, राम पिंपळगाव, एकदरा, माळेवाडी (सुलतानपूर) ह्या गावात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. यात शेळ्या, मेंढ्या, गाय व वगारीचा फडशा पाडला आहे. यात शेतकऱ्यांचे जीव भावाचे पशुधन दगावले असल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या ज्या शेतकर्यांचे नुकसान झालेले त्यांना तात्काळ आर्थिक मदत शासनाने द्यावी. तालुक्यातील एक नव्हे, दोन नव्हे तर अर्धा डझन गावापर्यंत बिबट्याच्या हल्याचे लोन पोहचले आहे. परिणामी प्रशासन व वन विभागाच्या विरुद्ध नाराजी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. आत्ता तरी वन विभागाने तात्काळ पाऊले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.