ताज्या घडामोडी
माजलगाव येथे विना कारण फिरणार्यांना पोलिस प्रशासना कडून नाकाबंदी लावण्यात आली आणि दंड ठोठावण्यात आला
शहर प्रतिनिधी : अलीम इनामदार पात्रुड
कोरोना विषाणूच्या वाढत्या अति प्रादूर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या संपूर्ण कडक लॉकडाउन ( दि. १६ मे ते २५ मे ) मध्ये जनतेला रस्त्यावर विना कारण फिरू नये,
आणि कोणत्याही अत्यावश्यक कामा-शिवाय घराबाहेर पडू नये म्हणून ,
तालुका माजलगाव येथे पोलीस प्रशासना मार्फत विना कारण फिरणार्यांनावर कडक कारवाई करण्यात आली
आणि वाहनांची तपासणी करून विना परवाना धारक चालकांना दंड ठोठावण्यात आला.
ही नाकाबंदी पी.आय.संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आली होती. पी.एस.आय.वैभव सारंग,
पी.एस.आय.सचिन दाभाडे, ए.एस.आय.खदीर शेख, राज संसाने सह पूर्ण टीम होती.