ताज्या घडामोडी

नेरी तंमुसच्या पुढाकाराने प्रेमी युगल विवाहबद्ध

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

विवाह हे पुरुष व स्त्री अशा दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मियांत हा संस्कार आहे तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथे आज दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या वतीने एका प्रेमीयुगलाचे विवाह ग्रामपंचायतच्या आवारात लावून देण्यात आले. सोनेगाव वन येथील नवोदित प्रेमवीर शुभम हरिदास सारये(वय 28 वर्ष) जात माना व मौजा खंडाळा येथील नवोदित वधू धनश्री दशरथ चौखे(वय वीस वर्षे) जात माना या दोघांमध्ये मागील तीन वर्षापासून प्रेम संबंध निर्माण झाले त्याचे पर्यावसाण प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याची ठरवून सात जियेंगे साथ मरेंगे या मनीप्रमाणे या दोन्ही प्रेमवीरांनी विवाह करण्याचे ठरविले आणि दोन्ही घरच्या लोकांचा या विवाहाला विरोध असल्यामुळे त्यांना न जुमानता मुलगी सरळ मुलाच्या घरी आली तेव्हा दोघांनी दोघांच्या संमतीने लग्न करण्यासाठी अर्ज सादर केला समितीने अर्जाची रीतसर तपासणी करून उपरोक्त जोडप्याचा हिंदू रितीरिवाजा नुसार लग्न लावून दिले या विवाहप्रसंगी समितीचे अध्यक्ष हरिदास चांदेकर, ग्रामपंचायत सरपंच रेखा पिसे, ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रभान कामडी, माजी पोलीस पाटील शंकर पिसे, पत्रकार संजय नागदेवते, ग्रामपंचायत सदस्य वसंता कामडी, पिंटू खाटीक, नानाजी दडमल, सरिता जनबंधू, संगीता कामडी, संगीता वैरागडे, ललिता कडुकार, पदमा झिले, पद्मश्री नागदेवते, संदीप पिसे, पत्रकार रामचंद्र कामडी, तंटामुक्त समिती सदस्य अभिजीत कामडी, मोरेश्वर श्रीरामे, पंकज पाखमोडे, रुस्तमखा पठाण, अमोल पोपटे, डॉक्टर रमेश राऊत, माणिक नगराळे, गुलाब मानकर व गावातील इतर गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close