ताज्या घडामोडी

वृक्ष लागवडीबरोबर संवर्धन काळाची गरज

वाल्मिकी संस्थेचे संचालक अजिंक्य नखाते यांचे प्रतिपादन.

शांताबाई नखाते विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

प्रदूषण विरहीत पर्यावरणासाठी प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.याचाच एक भाग म्हणून वृक्षलागवडी बरोबर त्याचे संवर्धन होणं हि सुध्दा काळाजी गरज आहे असे प्रतिपादन वाल्मिकी शिक्षण संस्थेचे संचालक अजिंक्य नखाते यांनी केले.
पाथरी येथे रविवारी शिवाजीनगर येथील शांताबाई नखाते विद्यालयात वाल्मिकी शिक्षण संस्थेचे संचालक अजिंक्य नखाते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी रमेश सरोदे, प्राचार्य किशन डहाळे ,रमेश नखाते मुख्याध्यापक नवनाथ यादव, प्रभाकर महाजन ,प्रल्हाद शहारे,श्याम शेळके ,श्याम मचाले,विलास पवार , रामेश्वर थोरे यांची उपस्थिती होती.
वाल्मिकी शिक्षण संस्थेअंतर्गत शांताबाई नखाते विद्यालय पाथरी,कासापुरी,देवगावफाटा, रामपुरी, देवनांद्रा व वालूर येथील शाळेत केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा अजिंक्य नखाते यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले की, वृक्षारोपण कार्यक्रमातून प्रत्येकाला समाधान मिळत असते पण दुसरीकडे लागवड केलेल्या वृक्षाच्या संवर्धनसाठी हे वृक्ष शिक्षक व विद्यार्थ्यांनी दत्तक घेतली पाहिजे.वृक्षारोपण आणि संवर्धन हि सामाजिक चळवळ बनली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close