ताज्या घडामोडी

विद्युत खांबांवरील तारा काढल्याप्रकरणी शेतकऱ्याची महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंत्याकडे द्वारे तक्रार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शेतकरी विठ्ठल पांडुरंग रणेर यांचे लोणी शिवारात शेत आहे.
मागील दीड ते दोन महिन्यापासून विद्युत खांबावरील तारा काढण्यात आले आहेत. अशी तक्रार विठ्ठल पांडुरंग रणेर यांनी महावितरण कार्यालयातील सहायक अभियंत्याकडे केली आहे.
दोन विद्युत खांबा दरम्यान तारा काढून टाकण्यात आल्याने विठ्ठल पांडुरंग रणेर यांचा विजेचा पुरवठा खंडित झाला आहे.
ते पाठी मागील कित्येक दिवसांपासून सहाय्यक अभियंता यांच्याकडे चकरा मारत आहेत.
अखेर शेवटी त्यांनी महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कडे एका निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
विठ्ठल पांडुरंग रणेर यांनी तक्रारीत म्हटले आहे की शेतातील उभा ऊस पाण्याअभावी वाळत असून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी सहाय्यक अभियंता शेबाळे यांच्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आता पाथरी महावितरण कार्यालय येथील सहाय्यक अभियंता शेबाळे हे काय कारवाई करणार याकडे आता तालुक्याचे जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close