गंगाखेड मतदार संघातील सर्व गावातील पंचनामे करा : आ. डॉ. रत्नाकर गुट्टे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पालम ,पूर्णा, गंगाखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील चार दिवसापासून गंगाखेड पालम पूर्णा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्याला पूर आला होता. अतिवृष्टीमुळे व नदी नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे कापूस, तूर ,सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसगट पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे. पावसामुळे घराचे नुकसान झाले त्या घराची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच पावसामुळे व पुरामुळे वाहून गेलेल्या पशुधनाचे पंचनामे करून शासन नियमाप्रमाणे त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले असून संबंधित सर्व तहसीलदार तालुका क्रषी अधिकारी यांना तातडीने पंचनामे करण्याची सुचना केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप आळनुरे, गंगाखेडचे प्रभारी हनुमंतराव मुंडे ,पालम पूर्णचे प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे ,गणेशराव कदम, शिवाजी पवार,गजानन माने, बाळासाहेब कुरे ,गणेशराव घोरपडे ,विजय शिंदे, भगवान शिरस्कर ,अतुल धुळगुंडे, असदखाँ पठाण, अजीमखाँ पठाण, मोबीन कुरेशी, उबेदखाँ पठाण, राहुल शिंदे, बाळासाहेब कराळे ,हनुमंत शेटे ,शिवाजी पालमकर, पिर खा पठाण, चंद्रकांत गायकवाड ,गजानन मस्के, बाबासाहेब एंगडे, गफार कुरेशी,रहीमतुलाखाँ पठाण,भारत डोणे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आ.गुट्टे हे आज बुधवारी दुपारी पालम तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करनार असुन पावसामुळे पडझड झालेल्या घराची पहाणी करनार आहेत.