ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाथरी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 02 डिसेंबर 2021 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पाथरी तालुक्यातील ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असल्यामुळे व पाथरी तालुक्यातील एकमेव असणारा श्री. रेणुका शुगर्स साखर कारखान्याची गाळप क्षमता कमी असल्यामुळे म्हणजे केवळ 1200 मेट्रिक टन एवढीच असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याची गाळप क्षमता नसल्यामुळे ऊस फडातच राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे भविष्यातील ही मोठी अडचण ओळखून भारतीय कम्युनिस्ट पक्ष पाथरी तालुका कमिटीच्या वतीने ह्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत पाथरी येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. विश्वनाथ (अण्णा) थोरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव मा. कॉम्रेड राजन क्षीरसागर हे उपस्थित होते. या सभेमध्ये असे ठरविण्यात आले की येत्या 6 डिसेंबर 2021 रोजी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी तालुका आणि जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ पुणे येथील साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन या बाबत एक निवेदन देऊन कारखाना प्रशासनास गाळप क्षमता वाढविण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती करण्यात येणार आहे.
तसेच कारखान्याच्या विरोधातील याचिका लवकर निकाली काढण्यासाठी कारखाना प्रशासनाकडून कुठलीच हालचाल होत नसल्यामुळे पाथरी, मानवत आणि सोनपेठ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी पाथरी येथील तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
यावेळी मान्यवरांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संयोजन कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे -भाकप तालुका सचिव, यांनी व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कॉम्रेड सुधीर कोल्हे – भाकप सोशल मीडिया सेल प्रमुख पाथरी यांनी केले तसेच यावेळी कॉम्रेड नवनाथ कोल्हे, कॉम्रेड मुंजाभाऊ लिपणे, कॉम्रेड विजयसिंह कोल्हे, कॉम्रेड श्रीनिवास वाकणकर कॉम्रेड सिकंदर भाई पठाण, कॉम्रेड विलास दळवे, कॉम्रेड कैलास लिपणे, व ईतर पदाधिकाऱ्यांसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.