ताज्या घडामोडी
पाणीच पाणी चोहीकडे दलीत वस्तीचा निधी गेला कोणीकडे -आकाश श्रीरामे… अध्यक्ष बौद्ध पंच कमिटी खंडाळा
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खंडाळा गाव पेठभानसुली गटग्रामपंचायत मध्ये येत असुन गावातील लोकसंख्या ही चारशेचा घरात असुन गावात बरीचशी दलीत वस्ती असुन अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांचा वस्तीचा विकास करणे योजनेतुन गावातील सर्व समाज बांधवांना समाज मंदिर बांधकामाची आवश्यकता असुन सामाजिक कार्यक्रमा करीता सभेकरीता सामाजिक सभागृहाचे बांधकाम होणे गरजेचे असुन दहा वर्षा पासून खंडाळा येथील समाज बांधव समाज मंदिर बांधकामाची वाट बघत असुन सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्याची मागणी खंडाळा येथील बौद्ध पंच कमिटी अध्यक्ष आकाश श्रीरामे यांनी केली आहे.