ताज्या घडामोडी

समाजाला अण्णाभाऊंच्या विचारंची गरज–शंकर शिरगुळे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

महाराष्ट्र ही साधु संत व महापुरुषांच्या विचारांनी पुनित झालेली भुमी आहे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून सर्व जाती धर्माचे नायक ऊभा केले त्यामुळे आजच्या परीस्थितीत अण्णा भाऊंच्या विचारांची नितांत गरज गरज असल्याचे प्रतिपादन मातंग एकता आंदोलानाचे शंकर शिरगुळे यांनी केले आज मातोश्री वाल्हाई साठे नगर जुना जालना येथे मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करुन अण्णा भाऊ साठे यांचा जय घोष करण्यात येऊन विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मातंग एकता आंदोलानाचे शंकर शिरगुळे भगवान कांबळे सुरेश शिरगुळे आकाश तांबे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close