ताज्या घडामोडी

विवेकानंदांचे तीन ‘त’ कार अंगिकारावेत : कवी कैलास सुरवसे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात life science विभागाच्या वतीने आयोजित बी एस्सी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कैलास सुरवसे सर यांनी स्वामी विवेकानंदांच्या तेजस्विता ततपरता आणि तन्मयता या तीन ‘त’ काराची आठवण करून दिली …कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव सर यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला..आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थांना महाविद्यालयात कोरोना संबंधी प्रतिबंधात्मक उपाय पालन करन्याचे आवाहन केले…यावेळी व्यासपीठावर श्री श्रीनिवास केशट्टी सर (उपप्राचार्य)
डॉ. गायकवाड सर (मत्स्यशास्त्र विभाग प्रमुख)
डॉ.कुलकर्णी सर (सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख)
डॉ.जगताप सर (प्राणिशास्त्र विभागप्रमुख)
डॉ.सबिया मॅडम(वनस्पती शास्त्र विभागप्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते…
सुत्रसंचलन वैभव काळे व गायत्री काकडे तर आभार प्रदर्शन नंदिनी पल्ले या विद्यार्थ्यांनी ने केले…
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकवर्ग तसेच स्वराज पवार , दिव्या काळदाते , आकाश मेखले , सीमा मस्के , सायली काळे , राहुल नवघरे, नागेश अंभोरे , विष्णू दुधाटे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close