ताज्या घडामोडी

पशु परोपजीवीशास्त्र विभागातर्फे पशु परोपजीवी शात्राज्ञांची ३० वी राष्ट्रीय परिषद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पशुधनातील कीटक व्यवस्थापनाकरिता हानीकारक रसायनांवर कमीत कमी अवलंबित्वासह पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या दृष्टिने एकात्मिक परजीवी व्यवस्थापनाच्या माध्यमातून, पर्यावरणास अनुकूल विविध मार्गांनी पशुधनाचे उत्पादन वाढविणे हि काळाची गरज असल्याचे मत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल डॉ. आशिष पातुरकर यांनी पशुवैदक व पशु विज्ञान महाविद्यालय परभणी तर्फे आयोजित पशु परोपजीवी शात्राज्ञांच्या ३० व्या राष्ट्रीय परिषदे मध्ये व्यक्त केले.
पशुवैदक व पशुविज्ञान महाविदलयातील पशु परोपजीवीशास्त्र विभागातर्फे १४ ते १६ डिसेंबर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल डॉ. आशिष पातुरकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल , *पशू विज्ञान शाखेचे अधिष्ठाता तथा शिक्षण संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा नागपूर विद्यापीठाच्या कार्यकरी परिषद सदस्या श्रीमती मीराताई दादासाहेब टेंगसे , माजी सभापती दादासाहेब टेंगसे, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.नितीन मार्कंडेय ,राष्ट्रीय परोपजीवी परिषेदेच्या अध्यक्षा डॉ. के. देवडा , सचिव ,डॉ. ए . संग्रान आणि राष्टीय परिषेदेचे मुख्य आयोजक डॉ. बाबासाहेब नरळदकर हे व्यसपीठावर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close