ताज्या घडामोडी

परवानाधारक देशीदारू विक्रेत्यांकडून ग्राहकाची लुट

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर जिल्यामध्ये अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्या काळात बऱ्याच लोकांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून दारू विक्री सुरू केली होती. त्यात दारू पिणाऱ्या ची आर्थिक लूट होत आहे अशी ओरड केली जात होती.नुकतीच मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी उठवली, दारूबंदी उठवल्यामुळे आतातरी देशी दारू ग्राहकांची आर्थिक लूट थांबेल या आशेने मध्य प्रेमींनी स्वागत केले. मात्र नेरी येथे जुनेच बार व देशी दारूचे दुकान त्या ठिकाणी सुरू झाले. याच परवानाधारक देशी दारूच्या दुकानातुन बाटलीवर छापील किमतीपेक्षा जास्त रुपये घेऊन जसे 180 मिली बाटल वर छापील किंमत साठ रुपये असताना प्रत्यक्ष विक्री 70 रुपये घेणे, 90 मिली बॉटल वर छापील किंमत तीस रुपये असताना प्रत्यक्ष विक्री 35 रुपये घेणे अशा प्रमाणे दारूची विक्री केली जात आहे. त्यामुळे दारू बंद असताना जशी ग्राहकांची आर्थिक लूट सुरू होती त्याच प्रमाणे दारू सुरू केल्यानंतर सुद्धा ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे. अशी आर्थिक लूट सुरू असल्यामुळे व देशी दारूची दुकाने 4 वाजताच बंद होत असल्याने दारू पिनारे ग्राहक हे आपल्या कामावरून सांयकाळी पाच , सहा वाजता येतात तेव्हा दारू दुकाने बंद होतात व 6Oरुपयाची बाटल त्यांना शंभर ते 12O रुपये देऊन घ्यावी लागते म्हणुन देशी दारू ग्राहकांत नाराजी पसरली आहे. प्रत्येक परवानाधारक दुकानदारांनी बॉटल वरील छापील किंमत ही सर्व करार व शुल्क समाविष्ट असल्यामुळे त्याच किमतीत देशी दारू ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी व दारूची दुकाने कमीत कमी सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी देशी दारू ग्राहकांची आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close