विलासकाकांनी शेतकऱ्यांसाठी समर्पित आयुष्य वेचले-आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या विलासकाका पाटील उंडाळकर प्रवेशद्वाराचे उद्धघाटन.
प्रतिनिधी:प्रमोद राऊत कराड
विलासकाकांनी आपले सामाजिक आयुष्य शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वेचले. काकांचे तेच काम उदयसिंह पाटील जिद्दीने करण्याचा प्रयत्न करत आहेत. विलासकाकांचे शेतकऱ्यांना समर्पित आयुष्य होते. त्यांचे स्मरण व्हावे व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे. कराडच्या बाजार समितीने काकांच्या नावाने उभारलेल्या भव्य प्रवेशद्वार कमानीत प्रवेश केल्यानंतर काकांच्या दृष्टीची माहिती घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेले काम, शेतकऱ्यांचा राखलेला सन्मान, अधिकार व पिळवणूक होवू नये, याकरिता त्यांनी अहोरात्र काम केले. त्यांच्या नजरेसमोर शेतकरी वर्ग होता व तोच त्यांचा केंद्रबिंदू होता. याचे कायम स्मरण ठेवू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर प्रवेशद्वार कमानीच्या उद्धघटन समारंभात ते बोलत होते. माजी खा. श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, अजितराव पाटील – चिखलीकर, बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, उपसभापती संभाजी चव्हाण, सर्व संचालक, आप्पासाहेब गरुड, वसंतराव जगदाळे, निवासराव थोरात, हणमंतराव चव्हाण, अनिल मोहिते, शंकरराव खबाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.