औद्योगिक बल्लारपूर नगरीत पाण्याची भीषण टंचाई
वयोवृद्ध व्यक्तीचा हातपंप वापरताना झाला मृत्यू , दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करा -राजू झोडेंची मागणी
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
बल्लारपुर शहरातील अनेक वार्डात गेल्या 26 एप्रिल पासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून याकडे बल्लारपुर नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण यांच्यामुळे संतोषी माता वार्डात राहणाऱ्या गोरे नामक 80 वर्षीय इसमाचा हातपंप वापरताना मृत्यू झाला. ही अतिशय गंभीर बाब असून बल्लारपुर नगरपरिषदचे मुख्याधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी काल केली आहे.
मागील पाच ते सहा दिवसांपासून बल्लारपुर शहरातील अनेक वार्डात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.अशातच मुख्याधिकारी, तहसीलदार व महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. पाणी मिळत नसल्याने एका 80 वर्षीय वृद्ध इसमाला बोरिंग हाताळताना जागीच मृत्यू झाला.त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब असून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी झोडे यांनी केली आहे.