मुलांना घडवताना पालक हा महत्त्वपूर्ण घटक आहे – ब्रह्मकुमारी मीरा दीदी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक २३ जुलै २०२३ वार रविवार रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून विजन पब्लिक स्कूल सोनपेठ या ठिकाणी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असता कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रह्मकुमारी मीरा दीदी तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर सूर्यवंशी सर,पत्रकार किरण स्वामी कृष्णा पिंगळे प्रिन्सिपल दत्ता नरहरी सर तसेच अध्यक्षीय समारोप करतेवेळी मीरा दीदी यांनी मुलांना घडवण्यात पालकांची जबाबदारी खूप मोठी आहे विविध उदाहरणे देऊन समजावून सांगत , आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मुलांना करून देणे याची गरज आहे नैतिक मूल्यांची जडणघडण हे घरातूनच बाल मनावर रुजले जाते. तसेच प्रिन्सिपल दत्ता नरहरे सर यांनी शाळेत होणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटीज द्वारे मुलांच्या सर्वांगीण विकासात कडे जास्तीत जास्त लक्ष कसे दिले जाते याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले पालकांच्या विविध समस्या प्रश्न उत्तर स्वरूपाने जाणून घेऊन त्याच्यावर पर्याय काढण्यासाठी प्रयत्नशील राहू असे विचार नरहरे सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व टीचर्स स्टाफ व पालक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.