ताज्या घडामोडी

केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे (दादा) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी जिल्ह्यामध्ये जून महिन्यापासून जिल्ह्याला चार वेळाअतिवृष्टीचे तडाखे बसले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली जाऊन तसेचपिकावरील वाढत्या बुरशीजन्य रोगाने शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या व पूराच्या पाण्याने शेत जमिनी खरडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. एकंदरीत नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हवालदील झाला आहे.
ह्या पार्श्वभूमीवर मा. मंत्री महोदय अडचणीतील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक 03 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे दादा परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
परभणी तालुक्यातील दैठणा येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी करते वेळेस व शेतकऱ्यांशी संवाद. त्यावेळी मा.आमदार मोहन भाऊ फड साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम साहेब,महानगर अध्यक्ष आनंदराव भरोसे साहेब, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे साहेब, जिल्हा सरचिटणीस आकाश लोहट पाटील, विलास कच्छवे विनायक कातकडे,नवनाथ वाघ, सर्व शेतकरी बांधव ईत्यादी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close