ताज्या घडामोडी

डॉ बाबासाहेब आंबेडकर निष्नात दुरदृष्टीचे वकील – समतादूत प्रज्ञा राजुरवाडे

बार्टि तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वकिली शताब्दीवर्ष

मुख्य संपादकः कु.समिधा भैसारे

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत गोरगरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून फिरत्या न्यायालयाची मागनी केली होती त्यावेळेस जर हे विधेयक मंजूर झाले असते तर आज घडीला तिन कोटी केसेस प्रलंबीत नसत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलीत सर्वव्यापकता, मानवतावादी, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायमची तत्परता असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दुरदृष्टीचे निष्नात वकील होते. दिवानी व फौजदारी न्यायालय चिमूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली शताब्दी वर्ष कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे कार्यक्रमाच्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ अधिवक्ता संघ चिमुर चे अध्यक्ष आर.आर.सोनडवले, प्रमुख अतिथी अधिवक्ता संघाचे सचिव अगडे, अधिवक्ता महेशदत्त काळे, अधिवक्ता लांबट, अधिवक्ता शिवरकर ,अधिवक्ता थुटे, अधिवक्ता श्रीरामे,अधिवक्ता हिंगे,अधिवक्ता आर जी रामटेके, अधिवक्ता एन यू रामटेके, अधिवक्ता सूभाष नन्नावरे, अधीवक्ता संजीवनी सातारडे, अधिवक्ता नितीन रामटेके आदी उपस्थित होते दरम्यान समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी सविधान रत्न अधिवक्ता नितीन रामटेके यांचा सत्कार करत सर्व अधिवक्ता यांना बार्टीच्या वतीने संविधान प्रत देन्यात आली.
पुढे बोलताना समतादूत राजूरवाडे म्हणाल्या की, समाजसुधारक र.धो कर्वे हे महीलाचे स्वास्थ व लैंगिक शिक्षणावर कार्य करित असताना समाज स्वास्थ ह्या नियतकालिके वर खटला भरवन्यात आला होता. तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे वकीलीपत्र घेतले होते. न्यायलयानी बाबासाहेब यांना विचारले होते हे विकृत आहे का बाबासाहेब यांनी उत्तर देताना म्हंटले की समाजात काहि लोकाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषय आवडत नाही म्हणून कर्वे नी लिहायचेच नाही का? आज इतक्या वर्षांनी जेव्हा लैंगिक हिंसाचार समाजात होतात. तेव्हा कर्वे चा डॉ बाबासाहेबांनी चालवलेला खटला आज ही किती म्हत्वाचा वाटतो. डॉ बाबासाहेब यांचे जेधे मोरे बद्द्ल राजकिय वैमनष्य होते तरी त्यांचे ही वकिलीपत्र घेतले म्हणून वकिलांनी न्याय मिळवून देताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीला समोर ठेवुन न्यायदानाचे लक्ष्य प्राप्त करावे न्यायाची दये सोबत गफलत करु नये समाज हा न्यायामुळे सक्षम स्वयंपूर्ण होतो. तळागाळातील वंचित घटकाना न्याय मिळवून दिला पाहीजे असल्याचे बोलत होत्या. कार्यक्रमाचे संचालन अधिवक्ता डी के नागदेवते आभार अधिवक्ता जे डी मुन यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य वकील होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close