ताज्या घडामोडी

सिल्लोरी येथे शिवजयंती साजरी

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील सिल्लोरी येथील स्वयंप्रकाशित बहुउद्देशिय सामाजिक संस्‍था यांच्या मार्फत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सिल्लोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच शालू रामटेके, उपसरपंच यशोदा बागडे, समता सैनिक दल शाखा प्रमुख रंजना गौरखेडे यांच्या हस्ते
पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.याप्रसंगी संस्थांचे अध्यक्ष चेतन सोमकुवर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. १६व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव ‘जाणते राजे’ होते की त्यांच्या राज्यातील प्रजा सुखी होती, आनंदी होती. शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नसून, रयतेच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. “शेती पिकली तर रयत सुखी, रयत सुखी तर राजा सुखी’ हे सूत्र महाराजांना समजले होते.

त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन रयतेला मजबुती देणारा होता. म्हणूनच शिवाजी महाराज ‘शेतकरी हितकर्ते राजे’ होते.छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये शौर्य, धैर्य, सकारात्मकता, मुत्सद्देगिरी, युद्धनीती, दूरदृष्टी, व्यावहारिकता आणि चातुर्य असे अनेक गुण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व धर्माचे, पंथांचे, जातीचे मावळे होते. जातीधर्माच्या मर्यादा ओलांडून स्वराज्यात सर्वांना शिवाजी महाराजांनी सामावून घेतले. त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे अशा शब्दात मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ,चेतन सोमकुवर सचिव,आकांत बागडे सदस्य, साहिल गजभिये, प्रज्वल पाटिल, कुणाल बोरकर ,अमर गौरखेडे, निखील सरदार,
समता सैनिक दल महिला
आदी मान्यवर व शालेय विद्यार्थी, गावातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्वल पाटिल यांनी केले.व आभार प्रदर्शन निखील सरदार यांनी मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close