माझ्या मुलांनो शिकत असतांना जर तुम्ही मस्ती खोर असाल तर भविष्यात तुम्ही बदमाश होनार असे समजु नका – कल्याणी भुरे
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2023/01/IMG-20230104-WA0162-1.jpg)
प्रतिनिधी:गणेश पगाडे लाखनी
मला आनंद होतोय की नविन वर्षाची सुरूवात या उज्जवल भविष्यातील विद्यार्थींना मार्गदर्शन करून झाली .
ज्या शाळेत मी 1992 ला जिजामाता विद्यालय वर्धा येथे दहावी झाली
त्या शाळेत विद्यार्थी मेळावा घेण्यात आला
त्या प्रसंगी माझे आई वडिल उपस्थित होते
माजी आमदार आदरणीय श्री विश्वनाथजी डायगव्हाने
सौ पुष्पाताई डायगव्हाने
शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रविन्द्रजी वाघमारे आणि शिक्षक वृंद उपस्थित होते…
मी शाळेतील विद्यार्थींना मार्गदर्शन केले
शाळेत असतांना शिक्षकांचा मार खाने खुप महत्त्वपूर्ण असते…आजच्या काळात तर मुलांना शिक्षा दिली तर आईवडिलांना मुले घरी जाऊन त्या शिक्षकांची तक्रार करतात.
पहिले आई वडिल स्वत: म्हनायचे मुलांना शिक्षा करा
म्हणुन आज ही मुलांची परिस्थिति अशी उद्भवली.
मुलांनो शाळेय जीवनात काही वाईट सवयी मधुन गेले तर अस होत नसते की तुम्ही वाईट मार्गाला लागाल बस त्या वेळेतुन बाहेर निघुन चांगला विद्यार्थी बना.
5 ते 10 च्या मुलांना याच वयात चांगले आणि वाईट अनुभव मिळतील पण तुम्ही फक्त स्वत:च्या मनाला वाईट गोष्टीं पासुन सावरा
शाळेतील जीवन म्हणजे जीवनाची यशाची पायरी असते ईथुनच तुम्हाला पुढे जाऊन जगावर नाव कमवायचे आहे.
मला अभिमान होतोय की नव्या नर्षाची सुरूवात नव्या युवकांना मार्गदर्शन करून करण्यात आले.