ताज्या घडामोडी

राज्यात आणी देशात दंगली च राजकारण होतय का ? डॉ.जितीन वंजारे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

राज्यात नाट्टयमय पद्धतीने दंगली घडवण्याच षडयंत्र रचल जातंय ?
1)एक नेता हिंदू मुस्लिम पेटल असं बोलतो आणी सरकार ला अल्टीमेट्म देतो
2)एक नेता मा.मुख्यमंत्री साहेबांच्या घरी हनुमान चालीसा म्हणन्याची धमकी देतो त्यावरून अक्षरशः दंगल घडते
3)एक नेता म्हणतो तुम्हाला तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको आहे मग आम्हाला पण आमच्या घरासमोर आजानची भोंगे लावून नको
4)यावरून नेत्या- नेत्यात भांडण लागतात फक्त शाब्दिक वार फक्त ते पण एसी केबिन मध्ये बसून फक्त मीडिया ला बोलून विरोध
5) आणी आपल शेतकऱ्याच ,गरीबाच,बाप मोल मजुरी करणाऱ्याच पोरग रस्त्यावर उतरत ,रखरखत्या उन्हात कायदा हातात घेत जसा की याच्या बापावर हल्ला झाला या त्वशेने घराबाहेर पडत आणी विरोधक पोलिसांचा गांडीवर मरुस्तर मार खात,जन्माच क्रिमिनल बॅकग्राऊंड जोडून घेत 353,153 अशी गंभीर गुन्हे अंगावर घेऊन सरळ कॅरक्टर खराब करून जेल मध्ये जातं .मग सोडवायला कोणीच येत नाही .सखा बाप माय बहीण भाऊ यांची खरी कसोटी लागते त्यांच्या जीवाला मोघम त्रास होतो .नेत्याच स्वतःच पोर बाहेर देशात जाऊन मोठी पदवी घेऊन वापस येत आणी रातोरात युवा नेता ,मोठा नेता ,आमदार खासदार मंत्री होत आणी आपला कार्यकर्ता मात्र जेल मध्ये खडी फोडतो हे आजकाल च्या राजकारनाच सूत्र आहे .त्यामुळे बदल झाला पाहिजे .भडकावंनारी माथी अगोदर फोडली पाहिजेत हा बदल जेंव्हा होईल खास तेंव्हाच देश बदलेल यात शंका नाही .जयभिम जयहिंद जय भारत.- लेखन मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर ,राजकीय अभ्यासक

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close